Thursday, April 1, 2010

मनसेच्या कामगार नेत्यांमध्ये शीतयुद्ध

सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 01, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: ms, politics, thane, mumbai

ठाणे - बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीनंतर कल्याणच्या सुभेदारीसाठी लढाई होणार आहे. त्यापाठोपाठ ठाण्याच्या किल्ल्याच्या लढाईला सुरुवात होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी ताकद वाढविण्यास सुरुवात केली, पण या वातावरणात एक प्रमुख लढवय्या पक्ष असलेल्या मनसेमध्ये सुंदोपसुंदी सुरू असल्याचे चित्र आहे. कामगार संघटक व कामगार नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.

राजकीय पक्षाच्या गटातटासाठी ठाण्यातील कोणताही पक्ष अपवाद नाही. कमी-अधिक संख्येने प्रत्येक पक्षात गट तट कार्यरत आहेत. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष आदी कोणताही पक्ष त्याला अपवाद नाही. विशेष म्हणजे एकहाती चालणारा पक्ष म्हणून ओळखली जाणारी मनसेही त्याला अपवाद राहिलेला नाही. त्याचा प्रत्यय मनसेच्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये येत असतो. एका गटाची पत्रकार परिषद अथवा कार्यक्रम असल्यावर दुसऱ्या गटाचे पदाधिकारी तेथे उपस्थित राहण्याचे टाळतात. हीच परंपरा आंदोलनातही सुरू ठेवण्यात आली आहे. अशा वातावरणात मनसेच्या कामगार सेनेचे संघटक मनोज चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना पाठविलेले पत्र चर्चेचा विषय ठरला आहे. या पत्रात त्यांनी थेट कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही, पण त्याच वेळी मनसेची कामगार सेना ही पक्षाची अधिकृत संघटना आहे. इतर कोणत्याही कामगार संघटनेचा त्याबरोबर संबध नाही, त्यामुळे इतर संघटनांच्या आंदोलनात अथवा मोर्चामध्ये मनसेची ताकद वापरू नये, असा सल्ला या पत्रात दिला आहे. शहराध्यक्ष हरी माळी यांना पाठविलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. तसेच ही माहिती सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचविण्यास सांगितले आहे.

आजच्या घडीला ठाण्यात मनसेचे कामगार नेते म्हणून राजन राजे हे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आंदोलनात पक्षाचे काही पदाधिकारी आवर्जून उपस्थित असतात. या पदाधिकाऱ्यांबरोबरच मनसेच्या इतर कार्यकर्त्यांना राजन राजे यांच्या कामगार संबंधित आंदोलनात सहभागी न होण्याची दिलेली तंबी म्हणून या पत्राकडे पाहिले जात आहे. या पत्रामुळे राजेविरोधी गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे; तर त्यांचा समर्थक गट मात्र राजन राजे यांच्यामुळे मनसेची नाळ कामगारांबरोबर जुळली जात असताना त्याला अटकाव का, असा प्रश्‍न उपस्थित करीत आहेत.

याबाबत राजन राजे म्हणाले, 'माझी कोणतीही वैयक्तिक संघटना नाही. कंत्राटी अथवा तथाकथित कायम कामगारांच्या अंतर्गत युनियनने बोलावले तरच मी संबंधित कंपनीत जातो. माझ्याकडे शेवटची आशा म्हणून कामगार येतात. आजच्या घडीला सचोटीने कामगारांचे नेतृत्व करणारा नेता उरलेला नाही. सचोटीने कामगारांना न्याय मिळवून देणे माझे धर्मकर्तव्य आणि पिंड आहे. भगवान श्रीकृष्णाला मी गुरू मानले आहे. माझ्या क्षमतेत राहून मला माझे काम करीतच राहावे लागणार आहे.''

या प्रतिक्रियेवरून मनसेच्या कामगार संघटकांनी पदाधिकाऱ्यांना राजेसोबत न जाण्याचे आवाहन केल्यावरही राजन राजे यांचे कामगार क्षेत्रातील काम वेगानेच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भावी काळात हा संघर्ष अधिक पेटण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

Wednesday, March 31, 2010

Parshavnath Engineering Collage.Trusty Arrested.

पाश्र्वनाथ इंजिनीअरिंगचा विश्वस्त शहाला अटक आणि सुटका
ठाणे, ३० मार्च/प्रतिनिधी
पाश्र्वनाथ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शासकीय शुल्कापेक्षा २९ हजार ३०० रुपयांचे अतिरिक्त शुल्क घेतल्याच्या गुन्ह्याखाली कॉलेजचे विश्वस्त टेकचंद जेठालाल शहा याला काल रात्री अटक झाली, तर सफाई कामगारांच्या पगारातील रक्कम आणि पर्यवेक्षकांच्या मानधनाच्या अपहारप्रकरणी त्याला आज जामीन मिळाला. पाश्र्वनाथ इंजिनीअरिंग महाविद्यालयातील भोंगळ कारभार आणि सफाई कामगारांच्या पगारातील अपहारप्रकरणी मनसेचे नेते राजन राजे यांनी संप पुकारला होता. त्यावेळी विश्वस्त शहा व अन्य पदाधिकाऱ्यांना काळे फासून गोंधळ उडाला होता. दोन आठवडे कॉलेज बंद असताना विद्यापीठाने चौकशी सुरू केली. पोलिसांमध्ये महिला कर्मचाऱ्यांनी अश्लील वागणुकीप्रकरणी तक्रारी केल्या होत्या. महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात राजकीय तोफ थंडावल्यानंतर काल बोरीवलीतीत दिलीप गुंजाभाई पटेल यांच्या तक्रारीवरून शहा याला अटक करण्यात आली. शासकीय नियमानुसार इंजिनीअरिंगला ४५ हजार ५७० रुपये शुल्क असताना कॉलेजने विद्यार्थ्यांकडून ७५ हजार रुपये घेतले. पावती मात्र ४५ हजार ५७० रुपयांची दिली. असे बहुतेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेले आहे. कासारवडवली पोलिसांकडून अटक झाल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात दाखल झालेला शहा दुपारी जामिनावर सुटला

Saturday, February 27, 2010

‘पाश्र्वनाथ’ च्या संस्थाचालकांवर कारवाईचे आदेश

‘पाश्र्वनाथ’ च्या संस्थाचालकांवर कारवाईचे आदेश
ठाणे , २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी
ठाण्यातील वादग्रस्त ठरलेल्या पाश्र्वनाथ इंजिनीअरिंग कॉलेजचे विश्वस्त टेकचंद शहा यांच्यावर कोरवाईचे आदेश राज्याचे उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिले. तसेच आवश्यकता भासल्यास कॉलेजवर सरकारी प्रशासक नेमून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यादृष्टिने कॉलेज लवकर सुरू करण्याचे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी दिले. भाजपाचे आमदार संजय केळकर तसेच मनसेचे नेते राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी आदींनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. याप्रसंगी मनसेचे सुरेश कोलते, विभाग अध्यक्ष महेश ठाकूर, विक्रांत कर्णिक आदी उपस्थित होते.
शिक्षिकांशी अश्लील वर्तन, शिक्षक, कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर न देणे, विद्यार्थ्यांना त्रास देणे, अवाजवी डोनेशन घेणे, खोटी कागदपत्रे दाखवून शासनाची फसवणूक करणे अशा अनेक पाश्र्वनाथ इंजिनिअरिंग कॉलेज गाजत होते. त्यातच व्यवस्थापनाने कॉलेजला टाळे लावल्यामुळे विद्यार्थी व शिक्षक हवालदिल झाले होते. घोडबंदर रस्त्यावर कासारवडवली येथे असलेल्या या कॉलेजमधून इंजिनीअरिंग, फार्मसी व पॉलिटेक्निक विभागातून साडेतीन हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात तसेच १५० शिक्षक व ७० शिक्षकेतर कर्मचारी येथे कामाला आहेत. कॉलेज सुरू करणारे टेकचंद शहा व व्हाइस प्रिन्सिपल शरद दत्तात्रय शहा ऊर्फ कुमार यांनी काही सहकाऱ्यांना हाताशी धरून काही वर्षांपासून मनमानी कारभार सुरू केला. शरद शहा याच्यावर महिला कर्मचारी, शिक्षकांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप २००१ पासून होत आहे.

‘पाश्र्वनाथ’ च्या संस्थाचालकांवर कारवाईचे आदेश

‘पाश्र्वनाथ’ च्या संस्थाचालकांवर कारवाईचे आदेश
ठाणे , २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी
ठाण्यातील वादग्रस्त ठरलेल्या पाश्र्वनाथ इंजिनीअरिंग कॉलेजचे विश्वस्त टेकचंद शहा यांच्यावर कोरवाईचे आदेश राज्याचे उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिले. तसेच आवश्यकता भासल्यास कॉलेजवर सरकारी प्रशासक नेमून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यादृष्टिने कॉलेज लवकर सुरू करण्याचे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी दिले. भाजपाचे आमदार संजय केळकर तसेच मनसेचे नेते राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी आदींनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. याप्रसंगी मनसेचे सुरेश कोलते, विभाग अध्यक्ष महेश ठाकूर, विक्रांत कर्णिक आदी उपस्थित होते.
शिक्षिकांशी अश्लील वर्तन, शिक्षक, कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर न देणे, विद्यार्थ्यांना त्रास देणे, अवाजवी डोनेशन घेणे, खोटी कागदपत्रे दाखवून शासनाची फसवणूक करणे अशा अनेक पाश्र्वनाथ इंजिनिअरिंग कॉलेज गाजत होते. त्यातच व्यवस्थापनाने कॉलेजला टाळे लावल्यामुळे विद्यार्थी व शिक्षक हवालदिल झाले होते. घोडबंदर रस्त्यावर कासारवडवली येथे असलेल्या या कॉलेजमधून इंजिनीअरिंग, फार्मसी व पॉलिटेक्निक विभागातून साडेतीन हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात तसेच १५० शिक्षक व ७० शिक्षकेतर कर्मचारी येथे कामाला आहेत. कॉलेज सुरू करणारे टेकचंद शहा व व्हाइस प्रिन्सिपल शरद दत्तात्रय शहा ऊर्फ कुमार यांनी काही सहकाऱ्यांना हाताशी धरून काही वर्षांपासून मनमानी कारभार सुरू केला. शरद शहा याच्यावर महिला कर्मचारी, शिक्षकांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप २००१ पासून होत आहे.

पाश्र्वनाथ कॉलेजचा संप मागे ; विश्वस्ताने घेतली राज ठाकरे यांची भेट?


ठाणे, २५ फेब्रुवारी/प्रतिनिधी
पाश्र्वनाथ इंजिनिअरिंग कॉलेजमधील अनागोंदी कारभाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाईचे शिक्षण मंत्र्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणीत पाश्र्वनाथ कामगार संघटनेने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला. आठ दिवसानंतर आज महाविद्यालय सुरू झाले आणि मुंबई विद्यापीठाची सत्यशोधन आणि तंत्रशिक्षण संचालनालयाची समिती महाविद्यालयात दाखल झाली. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याचा दावा महाविद्यालयाचे प्रमुख विश्वस्त टेकचंद शहा यांनी केला आहे.
कासारवडवली येथील पाश्र्वनाथ इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्रशासनाने कर्मचाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांचेही शोषण सुरू केले आहे. विद्यार्थ्यांचे जप्त केलेले मोबाईल फोनसुद्धा गायब झाल्याच्या तक्रारी काही पालकांनी केल्या असून त्यापैकी एका पालकाने पोलीस ठाणे गाठले होते. भरमसाठ डोनेशन आणि शुल्क आकारूनही कॉलेजमध्ये सुविधांचा अभाव आहे. नवीन इमारतीचे अर्धवट बांधकाम असतानाही महाविद्यालय त्या जागेत हलविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना धोका संभविण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा बिकट परिस्थितीत काम करताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक करण्याच्या अनेक घटना घडल्या. या विरोधात पाश्र्वनाथ कामगार संघटनेने आवाज उठवून मनसेचे नेते राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली १७ फेब्रुवारीपासून संप पुकारला. याची दखल घेऊन तंत्रशिक्षण खात्याची समिती चौकशीसाठी दाखल झाली आणि काही कर्मचारी, विद्यार्थ्यांनी विश्वस्तांना काळे फासून एकाला मारहाण केली. परिणामी, प्रशासनाने महाविद्यालयाला टाळे ठोकले. हे प्रकरण चिघळू लागले आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे पाहून आमदार संजय केळकर व राजन राजे यांनी शिक्षण मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. शिक्षणमंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने संप मागे घेण्याची काल घोषणा करण्यात आली. त्यामुळे आज नेहमीप्रमाणे महाविद्यालय सुरू झाले. ते सुरू झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी आज तंत्रशिक्षण संचालनालयातील दोन सदस्यांनी महाविद्यालयास भेट दिली. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीचे डॉ. कृष्णा पाटील, प्राचार्य जे.एम. पाटील, वैभव नरावडे या सदस्यांनी चौकशी केली. याचा अहवाल विद्यापीठाला देऊन विधी विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कारवाई करण्याचे आश्वासन समितीने विद्यार्थी व संघटनेला दिले. मंगळवापर्यंत ठोस कारवाई न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा राजे यांनी दिला आहे.